google336aa3038a7d075c.html

Rudraksha

Amazing benefits of Rudraksha !

रुद्राक्ष धारणाने रोगपरिहार कशाप्रकारे होतो, ते पाहूया..

Let’s see how Rudraksha Dharana cures the disease.

  • रक्तदाब, हृदयरोग, क्षय, अशक्तपणा, इत्यादी रोगात रुद्राक्षाचा, स्पर्श हृदयस्थानी सतत होईल, अशा बेताने रुद्राक्ष गळ्यात घालावा.
  • वात रोग, नष्ट होण्यासाठी रुद्राक्ष दंडावर बांधावा.
  • कंबरदुखी, असलेल्यांनी कमरेला रुद्राक्ष बांधावा.
  • ग्रहपीडा दूर होण्यासाठी, सहा मुखी रुद्राक्षाची माळ गळ्यात धारण करावी, व रोज सकाळी स्नानानंतर  ”ॐ  नमः शिवाय” या मंत्राचा, 108 वेळा जप करावा.

रुद्राक्ष धारण करण्याचे  काही नियम पाहुया. 

  • दुसर्‍याने घातलेला रुद्राक्ष, कधीही धारण करू नका, किंवा स्वतःचा रुद्राक्ष दुसर्‍याला घालू नका.
  • रुद्राक्ष माळ बनवताना लक्षात ठेवा की, त्यात किमान २७ मणी असावेत.
  • घाणेरड्या हातांनी, कधीही रुद्रमणीला स्पर्श करू नका. तो नेहमी आंघोळीनंतरच धारण करावा.
  • रुद्राक्ष, नेहमी लाल किंवा पिवळ्या धाग्यात धारण करावा. काळ्या धाग्यात कधीही घालू नये.
  • रुद्राक्ष धारण करणाऱ्या व्यक्तीने, दररोज भगवान शंकराची पूजा करावी.
Rudraksha
Rudraksha

Rudraksha
Rudraksha

Rudraksha
Rudraksha

Rudraksha

रुद्राक्ष, म्हणजे शंकराचे पूजनीय स्वरूप आहे.

रुद्राक्ष, अंगावर धारण करून स्नान करणे म्हणजे, त्रिवेणी संगमयोग झाल्याचे पुण्य वचन आहे.
रुद्राक्ष, अंगावर धारण केल्याने ग्रहपीडा, इतर दोष होत नाही,
तसेच रक्तदाबावर, रुद्राक्षाचे पाणी दिले जाते.
मधुमेहासाठी रुद्राक्ष घासून, मधात घेण्याचा प्रघात आहे.
शिव, मृत्युंजय, गायत्री, दत्तात्रय व इतर काही साधनेत, जपमाळेत रुद्राक्ष माळेला सर्वश्रेष्ठ महत्त्व आहे.

षटकर्म बंधन, पंचदशी विद्या, जाप, तांत्रिक बंधन, यामुळे त्रस्त झालेली व्यक्ती शेवटी हताश होऊन, असेच उद्गारते की मला, “आवाहन, विसर्जन वगैरे पूजेचे उपचार ठाऊक नाहीत. तसेच मला मंत्र, क्रिया, भक्ती यांचेही ज्ञान नाही. तरीही हे देव-देवेश्वरा ! जगताचा नाथा ! तू माझे भवसागरापासून रक्षण कर, तुझ्या दर्शनाने पाप, दुःख, दारिद्र्य नष्ट होऊन, सुख संपत्तीची प्राप्ती होऊ दे ! प्रत्येक क्षणा क्षणाला, माझ्या हातून सहस्त्रावधी अपराध नित्य घडत आहेत. तथापि या तुझ्या दासाला तू क्षमा कर, आणि पुढील भविष्यकाळातील उन्नतीचा मार्ग दाखव..
अशी प्रार्थना आदिनाथांना (शिवाला) करावी.

लक्ष द्या.

तुम्हालाही रुद्राक्ष धारण करायचा असेल आणि जीवनातील सर्व अडथळे दूर करायचे असतील तर? 

सनातन धर्मानुसार, आपले वर्तमान जीवन आपल्या भूतकाळातील कर्मांशी संबंधित आहे, आणि ग्रहांच्या-कर्माच्या हालचालींचाही प्रभाव आहे. असे म्हटले जाते की काही लोक त्यांच्या भूतकाळातील कर्माची किंमत, वर्तमानात देतात. त्यामुळे त्यांचे सध्याचे जीवन सुधारण्यासाठी त्यांना खूप अडचणी, आणि समस्यांना तोंड द्यावे लागते. ग्रह आपला वेग बदलत राहतात, एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करत राहतात. या संक्रमणादरम्यान, ते 12 राशींवर प्रभाव टाकतात. काहींवर त्याचा चांगला परिणाम होतो, तर काहींवर वाईट परिणाम होतो. सामान्य माणसाला ग्रहांची स्थिती आणि त्यांचा जीवनावर होणारा परिणाम हे कळू शकत नाही, रत्नांप्रमाणे, रुद्राक्षावर देखील ग्रहांचे शासन आहे, ज्यामुळे ते ग्रहांच्या दुष्परिणामांवर उपचार करण्यासाठी रत्नांप्रमाणेच भूमिका बजावतात. तुमच्यासाठी कोणता रुद्राक्ष सर्वोत्तम आहे आणि ते अधिक प्रभावी ठरेल हे ठरवण्यासाठी, तुम्हाला तुमच्या दैवतेच्या साहाय्याने, सद्गुरू श्री चैतन्य गोरक्षनाथ यांच्या आदेशाने, तुमच्या समस्येचा अभ्यास करून, मी माझ्या स्वानुभवावरून, तुम्हाला योग्य तो रुद्राक्ष धारण करण्याचे भाकीत आणि मार्गदर्शन करीन, ज्याचा तुम्हाला सर्व प्रकारे फायदा होईल. असा विश्वास आहे. 

Knowledge article! Read more

Let’s hang out

Solution

महत्वाचे

निःपक्षपाती ज्ञान असल्याशिवाय आध्यात्मिक विश्लेषण सामान्य माणसाला सहज समजू शकत नाही. हेच कारण आहे की बहुतेक लोक त्यांच्या आयुष्यातील अचानक झालेल्या अपघातांना समजून घेण्यास अपयशी ठरतात आणि अनावधानाने घडलेल्या घटनेबद्दल निराश किंवा हताश होतात. ते त्यांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणावर शंका घेण्यास सुरुवात करतात आणि कधीकधी वास्तविकतेपासून पळून जाण्यासाठी नकारात्मक मार्ग निवडतात. अशा वेळी तुमच्यासाठी कोणता रुद्राक्ष सर्वोत्तम आहे आणि ते अधिक प्रभावी ठरेल हे ठरवण्यासाठी…!

अशा समस्यांसाठी सल्ला आणि उत्तरे मिळवण्यासाठी तुम्ही अनुभवी तज्ञाशी संपर्क साधावा.

संपर्क साधा : 9323946187

%d bloggers like this: